कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी अशा भित्तिपत्रिकेची आवश्यकता असते. राज्यशास्त्र विभागाने राजकीय व्यवस्था व सामाजिक मूल्याचा विचार करणारी ही भित्तिपत्रिका निर्माण करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली आहे. आजचे जग गतिमान असून दररोज नवनवे बदल होत आहेत. नवीन विचारसरणी समाजात रुजत आहे. या सर्वांचा विचार समाजहित लक्षात घेऊन करणे म्हणजे सामाजिक बांधिलकी स्वीकारणे होय.’
या प्रसंगी प्रा. बी. के. गोसावी, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. ए. पवार यांनी केले. प्रा. समीक्षा फराकटे यांनी आभार मानले.